उस्मानाबाद /प्रतिनिधी

उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची मुंबई येथे बदली झाल्यानंतर त्यांना उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीने सपत्नीक सत्कार करून निरोप समारंभ देण्यात आला यावेळी फुलांच्या पायघड्या व गुलाब पुष्पांचा वर्षाव करून पोलीस अधिकाऱ्यांनी परंपरेप्रमाणे गाडी ओढून बँड पथकाच्या वाद्यात निरोप दिला.यावेळी पावसाने सुद्धा हजेरी लावली.आकर्षक फुलांनी गाडी सजवली होती.

पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची उस्मानाबाद येथील कारकीर्द ही चांगली राहिली त्यांना उत्कृष्ट तपासबद्दल केंद्राचे गृहमंत्री पदक मिळाले तसेच त्यांनी केलेल्या तपासावर पुस्तक व त्यांच्या कविता संग्रह प्रकाशीत झाले आहेत. रौशन यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात मिसिंग केसेस ( हरवलेले व्यक्ती शोधणे) बाबत शोधण्यासाठी घ्यावयाची शोध कार्यपद्धतीची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली. या कौटुंबीक निरोप समारंभास उपविभाग पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे गजानन घाडगे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.

उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची बदली उपायुक्त मुंबई शहर येथे झाली आहे तर त्यांच्या ठिकाणी उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक म्हणून निवा जैन या आज पदभार घेणार आहेत, 

 
Top