तुळजापूर/ प्रतिनिधी-

राज्यातील बंजारा समाजातील नागरिकांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्रित येऊन लढा द्यावा , असे आवाहन माजी मंत्री संजय राठोड यांनी केले.

तालुक्यातील आलियाबाद येथे विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच ओबीसी आरक्षण पदोन्नती मधील आरक्षण,नाॅन क्रिमिलेयर सामाजिक राजकीय विषयांवर संवाद साधण्यासाठी राठोड आले होते.त्यावेळी ते बोलत होते. प्रथमतहा संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण होते तर व्यासपीठावर बंजारा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉ.टी.सी. राठोड, ,हरिष जाधव, लक्ष्मण चव्हाण, अमृता चव्हाण, माणिकराव चव्हाण,राजू चव्हाण, लखण चव्हाण, संजय राठोड,कुमार राठोड, उपस्थित होते.

राठोड म्हणाले उस्मानाबाद जिल्हा तांडा सुधारयोजने मध्ये समाविष्ट करण्यासाठी व भरीव निधी मिळावी तसेच देशात बंजारा समाजाला वेगवेगळ्या संवर्गात टाकले आहे ते एकाच संवर्गात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.त्यासाठी सर्वांनी लढा देण्यासाठी गरज असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास गुलाब जाधव , डॉ.सुरज चव्हाण,संदीप राठोड, लक्ष्मण राठोड, संतोष चव्हाण, वसंत पवार, दामाजी राठोड, सुर्यकांत राठोड यांच्यासह इतर समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी नाईक यांनी केले.तर आभार लखन चव्हाण यांनी मानले.

 
Top