उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 तातडीने जिल्ह्यातील सर्व विद्युत पुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करावा अन्यथा भाजपाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महावितरण कार्यालयातील अभियंत्यांना निवेदनाद्वारे भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे. 

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,  महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (महावितरण) यांच्याकडून होत असलेल्या सततच्या कमी दाबाने व अल्पकाळ विद्युत पुरवठयामुळे जिल्ह्यातील शेतकरी खूप मोठया संकटात सापडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाने ओढ दिली असल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यातच महावितरणकडून सततची लोडशेंडीग व कमी दाबाने विद्युत पुरवठा तसेच वीज येणे जाणे अशा असंख्य तक्रारी सर्व सामान्य शेतकरी वर्गास भेडसावत आहेत. त्याचप्रमाणे खराब  झालेली रोहित्रे त्वरीत दुरुस्त करुन मिळण्या मध्ये ही सतत अडचण होत आहे.  तसेच विहिरीत,  बोअरवेल, तळ्यात पाणी असताना महावितरणच्या गौरकारभारामुळे पिकास पाणी देता येत नसल्यामुळे आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. 

 याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड.खंडेराव चौरे, रामदास कोळगे, प्रदिप शिंदे, राजसिहा राजेनिंबाळकर, विनोद गपाट, नामदेव नायकल, ओम नाईकवाडी, श्रीकांत तेरकर, अशिष नायकल, गणेश मोरे, अभिराम पाटील, स्वप्निल पाटील, अभय इंगळे, प्रविण पाठक, विजय शिंगाडे, हिमत भोसले, सुनिल पंगुडवाले, तसेच शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top