उमरगा / प्रतिनिधी-

श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ साठी रोलर पुजन व हायड्रोलिक ट्रिपलर बांधकामाचे भुमीपूजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. 

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, चालु वर्षी कारखान्याने पाच लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हंगाम यशस्वी करणेसाठी सक्षम ऊस तोडणी वहातुक यंत्रणा भरण्यात आली आहे. गाळपासाठी कारखाना मशनरी सुसज्ज आहे. सर्व संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वांच्या सहकार्याने कारखान्याची यशस्वी घोडदौड सुरू आहे. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सादिकसाहेब काझी, उमरगा जनता बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील, सर्व संचालक,  ऊस उत्पादक शेतकरी, कार्यकारी संचालक एम.बी. अथणी, मुख्य शेतकी अधिकारी अतुल राखेलकर, चिफ इंजिनिअर अमोल आष्टेकर, चिफ केमिस्ट सुरेश गायकवाड, कार्यालयीन अधिक्षक के. एम. चौगुले आदीसह अधिकारी, कामगार, कर्मचारी उपस्थित होते. 


 
Top