तुळजापूर / प्रतिनिधी-
अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने गोंधळी समाजातील १२७ कुटुंबाना १५ वस्तूचे जीवनाश्यक कीटचे वाटप करण्यात आले. तसेच या जीवनाश्यक कीटचे वाटप संपुर्ण उस्मतानाबाद जिल्हयात करण्यात येणारी आहे. त्यामध्ये भूम, परंडा,वाशी या तीन तालुक्यास उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष श्री राजेंद्र (भाऊ) गायकवाड यांच्या मार्फत वाटप करण्यात येणार आहे. उर्वरित, तालुक्यास श्री प्रशांत (नंनू ) खंकाळ यांच्या मार्फत किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास तहसीलदार . सौदागर तांदळे, राजेंद्र वनारसे, सुरेश ढवळे, राजाभाऊ गायकवाड, मनोज लोंढे, श्रीकांत रसाळ, रवि साळुंके, हर्षवर्धन कांबळे, श्रीकांत रसाळ आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि साळुंके व अविनाश भोरे यांनी आभार मानले .