उस्मानाबाद / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील बऱ्याच चांगल्या गोष्टी समोर आल्या नाहीत चालु असलेले अन्याय, अत्याचार पाहून मॉं साहेब जिजाऊ ने स्वराज्य स्थापण्यासाठी अार्थिक बचत केली. आणि या आर्थिक बचतीतुनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे डाॅ.प्रतापसिंह पाटील यांनी केले.

जिजामाता उद्यान चौकात मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवमुर्ती पुजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रतापसिंह पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन मसूद शेख, सय्यद खलिल, प्रल्हाद मुंडे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, नादेरउल्ला हुसेनी,विक्रम पाटील, अमरसिंह देशमुख आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डाॅ.प्रतापसिंह पाटील यांनी ग्रामीण भागातील  लोकांनी जिजाऊंचा हा अार्थिक बचतीचा गुण घेणे आवश्यक आहे. सध्या ग्रामीण भागात नेहमीच अर्थकारणामुळे लोक अडचणीत येतात. त्यासाठी बचतीची सवय लावणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे ध्येय गाठण्यासाठी सर्व प्रकारची गंभीर मानसिकता तयार केली. महाराजांचा हा आदर्श घेण्यासारखा आहे, ४०० वर्षानंतर सुध्दा त्यांच्या विचारांची गरज आपल्याला आज ही भासते, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी शाम नवले, प्रकाश जगताप, भारत कोकाटे, जयंत पाटील, बाळासाहेब शिंदे, आनंद जगताप, भालचंद्र कोकाटे, राम मुंडे, विशाल पाटील, योगेश सोन्ने, गजानन खर्चे, प्रसादराजे निंबाळकर,ऋर्षीकेश चपणे आदी उपस्थित होते. 


 
Top