उस्मानाबाद / प्रतिनिधी:

सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी,अडचणी यांची न्याय आणि तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपायोजना म्हणून जिल्हा स्तरावर लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात  येतो.परंतु सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आणि प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने अनावश्यक गर्दी टाळणे गरजेचे असल्यामुळे दि.01 मार्च 2021 रोजीचा जिल्हा स्तरावरील लोकशाही दिन होणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार संतोष पाटील यांनी कळविले आहे.


 
Top