उस्मानाबाद / प्रतिनिधी:
  शासकिय विश्रामगृह, शिंगोली (उस्मानाबाद) येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कृषी विभागाची आढावा बैठक घेऊन उगवून न आलेल्या सोयाबीन बियाणेचे तात्काळ पंचनामे करणेच्या सूचना केल्या. याबैठकीस आ.कैलास घाडगे-पाटील, उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष नंदू भैय्या राजेनिंबाळकर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. कोळेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 मृग नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बाजारात विविध कंपन्याचे तसेच अनेकांनी घरगुती बियाणे खरेदी करून पेरणी चालू केली आहे. मान्यता प्राप्त कंपनीचे खरेदी केलेले बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे उगवण क्षमता नसलेले बियाणे विक्रीस आल्याचे निदर्शनास आले आहे. उगवण न झालेल्या सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अशा  सूचना खासदार साहेबांनी दिल्या. तसेच जिल्हाधिकारी सौ. दिपा मुधोळ-मुंढे यांच्या कडे पंचनामे करण्याबाबत कृषी विभागाला आदेशात करण्याबाबत विनंती केली.
  यावेळी जि.प कृषी अधिकारी श्री.निरडे, तालुका कृषी अधिकारी श्री. डी.आर जाधव,पं. स कृषी अधिकारी श्री. राऊत, नगसेवक सोमनाथ गुरव, आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 
Top