तेर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला या कंपनीच्या  महाबीज चे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने मूळेवाडी ता. उस्मानाबाद  येथील  शेतकऱ्यांनी  शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली आहे.
मुळेवाडी ता. उस्मानाबाद येथील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रा कडून महाबिजचे जे.एस। 335   या   जातीचे सो  211 लाँट नंबर असलेले सोयाबीन  बियाणे खरेदी केले होते .
या बियाणे ची पेरणी गेल्या आठ दिवसापूर्वी करण्यात आली होती . खरेदी केलेले सोयाबीन  बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने उगवून आले नसल्याचे कृषी विभागाकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे बियाणे उगवून आले नसल्याचे तक्रार मुळेवाडी येथील सुब्राव वराळे बाबुराव वराळे ,कल्याण चव्हाण ,दत्ता मुळे,  मोहन वराळे,हिराचंद वराळे या शेतकऱ्यांनी वैयक्तिक रित्या  तक्रार तालुका कृषी अधिकारी उस्मानाबाद, यांच्या कडे केली आहे.
तक्रारीच्या प्रती उपविभागीय  कृषी आधिकारी, उस्मानाबाद,  कृषी अधिकारी तालुका  पंचायत समिती उस्मानाबाद यांच्या कडे देण्यात आले असून दुसरे बियाणे व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
 
Top