उस्मानाबाद/ प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी (बें) येथील व सध्या उस्मानाबाद येथील  रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील, मराठी विभागात कार्यरत आसलेले प्रा. राजा जगताप यांनी सध्याच्या कोरोना परिस्थितीत व
लाॅकडाऊनच्या काळात... २५ मार्च पासून  उस्मानाबाद येथील परप्रांतीय विद्यार्थी,मजूर यांचेसाठी शासकीय यंञणांनी उभारलेल्या “निवारा केंद्रात” कोरोनाला न घाबरता ,प्रत्येक्ष जावून तेथील विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या,व्यथा जाणून घेतल्या होत्या तसेच रस्त्यांनी पायी चालत जाणाऱ्या कांही मजूरांच्या व्यथा प्रत्येक्ष भेटी घेऊन जाणल्या होत्या. तसेच उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यांने शहरातील गरिब व गरजू लोकांना अन्नदान, किट वाटप केले होते.उस्मानाबाद शहरात  लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या विद्यार्थिनी यांनाही मदत केली होती .
कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी, पोलीस कष्ट करत होते व त्यांच्यावर हल्ल्यांच्या घटना वाढत होत्या,स्थलांतरित मजूरांच्या व्यथा ,वेदना व त्यांच्या समस्या,विविध शहरात सोशेल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा!
कोरोनात घ्यावयाची काळजी,कोरोनामुळे झालेले बळीराजांचे नुकसान,मदतीसाठी सरसावलेले बळीराजे,क्वारंटाईनमुळे उद्भवलेल्या महिला मजूरांच्या समस्या, लाल परीची बिकटवाट आणि चारही लाॅकडाऊन राज्याची,मुंबईची चिंता कसे वाढवणारे ठरले आशा विविध विषयावर २५लेख सातत्याने लिहिले होते व  कोरोनाबद्दल जागृती केली होती व या विविध विषयावरील २३लेखांना  विविध दैनिकातून प्रसिध्दी मिळाली होती.हे लिहिण्यासाठी त्यांनी स्पाॅटवर जाऊन ,कोरोना योध्दा होऊन काम केल्याने,त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र व दिल्ली  येथील  विविध फाऊंडेशन,सामाजिक संस्था,मंडळे यांनी दखल घेऊन त्यांना  “कोरोना यौध्दा” म्हणून विशेष मानपञ, पुरस्कार एकुण विविध १७ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
Top