उस्मानाबाद /प्रतिनिधी
 तालुका कृषी विभागाद्वारे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीमूळे खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा करण्याच्या योजनेचा शुभारंभ आज ढोकी सर्कल येथून मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना. शंकरराव गडाख-पाटील यांच्या हस्ते झाला.
यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबळकर, आ. कैलास घाडगे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील शेतकरी व महिला बचत गटाच्या माध्यमातून कृषी निविष्ठांचा शेतकऱ्यांच्या बांधावर थेट पुरवठा करण्याचे उस्मानाबाद कृषी विभागाद्वारे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. यानुसार आज ढोकी, वाखरवाडी, कोल्हेगाव, गोरेवाडी, कावळेवाडी, तुगाव, कसबे तडवळे, गोपाळवाडी येथील कृषी विभागाद्वारे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) बचतगटाच्या माध्यमातून खते वाटप करण्यात आली.
यावेळी आ.कैलास घाडगे-पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक बजरंग मंगरुळकर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. कोळेकर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार गणेश माळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील, कृषी विकास अधिकारी श्री.चिमनशेट्टी साहेब, तालुका कृषी अधिकारी डी आर जाधव, पं.स.सदस्य संग्राम देशमुख, सरपंच नाना काळे, उपसरपंच अमोल समुद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे, माजी सभापती दगडू धावारे, तानाजी माळी, पोलिस पाटील राहुल वाकुरे, भारत काका देशमुख, उद्धव समुद्रे, मोहन शिंदे, उमेश शिंदे, मंडळ अधिकारी श्री.मगर साहेब, कृषी परवेक्षक श्री. सुरवसे साहेब, कृषी सहाय्यक श्री माकोडे, श्री. आडसूळ, श्री. शिंदे, श्री. भडंगे, शेतकरी वर्ग तसेच ढोकी येथिल रासायनिक खत विक्रेते उपस्थित होते.
 
Top