तुळजापूर/प्रतिनिधी-
९३ व्यां साहित्य संमेलनात रंगदृष्टी पुणे निर्मीत शाहीर अमर शेख साहित्य मंचावर  सादर करण्यात आलेल्या गावकथा या आगळया वेगळ्या नाटकाने सर्वांना विचार करण्यास भाग पाडले.
नाटकामध्ये  लुटली जाणारी स्ञी, पगार होईल या अशाने जगणारा प्राध्यापक,  बेकार तरूण हे हळूहळू नाश संस्कृती कडे निघालेल्यांची सध्या स्थिती दर्शविण्यात आली. आयुष्यातील घटनांवर आधारीत  हे नाटीक  जवळपास ८० मिनीटाचे आहे.  ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यांची नाळ भजनाशी जुळली असल्याने भजना पासुन गावकथेला सुरु होते आहे. भजनाच्या तुकड्यांतून गावातील पात्रांचे प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले आहे. ही ह्या नाटकाचे विशेषता आहे.
‘रंगदृष्टी, पुणे’या संस्थेने या प्रयोगाची निर्मिती केली असून संजय मोरे ठाकूर यांनी यांचे दिग्दर्शन केले आहे. संजय ठाकुर, महेंद्र प्रकाश, विनोद वणवे, अनिता डेंगळे, श्रीकांत शिवाजी, ऋताली वैद्य, रश्मी साळवी, तुषार हांडे, हर्षा ए.जी., अरबाज मुलाणी या कलाकरांनी सादर केलेल्या  अभिनयाने या नाटकाची रंगत वाडातच  जाते आहे.  मयुर मुळे, दीप डबरे यांचे संगीत असून, संगीत साथ शिवानी कंधारकर, अनिरुद्ध गोरे, गोपाळ तिवारी यांनी केली आहे.
 
Top