उस्मानाबाद/ प्रतिनिधी - धनगर आरक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच यांच्या माध्यमातून धनगर आरक्षण न्यायालयीन लढा अंतिम टप्यात आला असून या न्यायलयीन लढ्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. आरक्षणाच्या लढ्यामध्ये धनगर समाजातील प्रत्येकाने काहीतरी योगदान द्यावे यासाठी दानशुर व्यक्तींनी न्यायालयीन लढ्याचे साथीदार होण्यासाठी आर्थिक मदत करण्याची गरज असल्याने रविवार दि.२२ रोजी जत्रा फंक्शन हॉल उस्मानाबाद येथे धनगर आरक्षण न्यायालयीन लढा व विचार मंथन मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
    कळंब, उमरगा, भुम-परंडा-वाशी येथे धनगर समाज बांधवांनी गावागावात घोंगडी बैठका घेऊन प्रत्येक गावातुन निधी जमवून तेथील मेळाव्यात जमा केला. त्याप्रमाणे प्रत्येक गावातुन दुसरे कोणी पुढे होऊन करेल याची वाट न पाहता आपण स्वत: पुढे होऊन इतरांनाही सोबत घेऊन बैठका घेऊन निधी जमा करु व उस्मानाबादच्या कार्यक्रमात आपण सुध्दा या आरक्षणाच्या लढ्यात मागे नाही हे दाखऊन देऊ. या मेळाव्यात प्रत्येक कर्मचारी, अधिकारी, उधोजक, व्यवसायिक हे स्वयं स्फुर्तिने स्वखुशीने मदत करणार आहेत. या मेळाव्याचे आयोजन अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व चळवळीतील कार्यकर्ते यांनी केले आहे.
 या मेळाव्यास मार्गदर्शन करण्या करीता पुण्यश्लोक महाराणी अहील्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंचचे अध्यक्ष मधु शिंदे, सचिव ऍड.मुरारजी पाचपोळ, डॉ.जय प्रसाद बघेल, प्रा. कावळे, सुधाकर शेळके हे उपस्थित राहणार आहेत. आरक्षण संदर्भात कोणाला काही शंका-कुशंका असल्यास, केस विषयी माहिती हवी असल्यास, ती सविस्तर माहिती मान्यवर मंडळी आपणास देतील. या वेळी आरक्षण संदर्भातील संपूर्ण माहिती पावर पॉईंटद्वारे उपस्थितांना देण्यात येईल. यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाड्याचे नेते  सुरेशभाऊ कांबळे, पु.अ.स.प्र.मंचचे मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे यांनी केले आहे.

 
Top