भूम (प्रतिनिधी)- साहित्य संमेलन म्हणजे साहित्यकासाठी एक प्रकारचे आयोजकाकडून उपलब्ध करून दिलेली मेजवानीच असते कीत्येक कोसो दूर असलेला साहित्यिक आवर्जून यासाठी संमेलनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहतो. त्याला निमंत्रितपणातून मिळालेला सहभाग हा त्याच्या लेखणीसाठी मिळालेल एक प्रकारचं टॉनिकच असतं. हेच टॉनिक 26 ऑगस्ट 2026 रोजी लातूर येथील राष्ट्रीय रमाई साहित्यिक काव्य मंचच्या व्यासपीठावरून मिळणार आहे.
26 ऑगस्ट 2026 रोजीच्या लातूर येथिल राष्ट्रीय रमाई साहित्यिक काव्य मंचच्या माध्यमातून प्रा. रमा मन्नाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथेच एक दिवसाचे निमंत्रितांचे साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाची जोरदार तयारी सर्वजण अगदी तन-मन-धन लावून करत आहेत. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ज्येष्ठांचे मार्गदर्शन नवसाहित्यिकांना मिळणार आहे.
मार्गदर्शन हे त्यांच्या साहित्य लेखणीला टॉनिक स्वरूपात असणार आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक ठिकाणचे साहित्य संमेलन हे साहित्यकारांसाठी एक प्रकारे साहित्य लेखणीसाठी ऊर्जा मिळवून देणार असतं . प्रेरणा देण्यात येणार असतं. विचाराला चालना देणार असतं . एक प्रकारची मेजवानीच असते. साहित्य संमेलनातला आनंद हा खऱ्या अर्थाने एक प्रकारे आयुष्य जगण्यासाठी सुद्धा उभारी देणारा असतो . म्हणूनच साहित्यिक अशा संमेलनामध्ये सहभाग मिळत असेल तर राहते गाव . ठिकाण कितीही दूर असेल तरी तो हाती असलेलं कसलंही काम अगदी पर्यायी व्यवस्था करून .बाजूला ठेवून साहित्य संमेलनाला आवर्जून उपस्थित राहतो.
खऱ्या अर्थाने साहित्यिकाचे विविध प्रकारच्या कलेमधून साहित्य लेखणीची कला. साहित्य कलेची आवड. साहित्य लिखाण करणे हीसुद्धा एक वेगळ्या प्रकारची कलाच आहे. ही कला म्हणजे अख्या विश्वाच सौंदर्य , इतिहास , कारकिर्द चार ओळीत टिपण म्हणजे हा सुद्धा एक साहित्य लिखाणाचा प्रकारच आहे. थोरा मोठ्यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास चार ओळीत प्रगट करायचा म्हणजे तो सुद्धा एक बुद्धी कौशाल्याचा भाग आहे.
गावागावात, वाड्या - वस्त्यावर खऱ्या अर्थाने नव साहित्यिक निर्माण व्हावेत. त्यांच्या साहित्याला प्रेरणा मिळावी यासाठी विविध भागात विविध प्रकारचे साहित्य संमेलन आयोजित करणे सुद्धा काळाची गरज आहे. मग त्यामध्ये बाल साहित्य संमेलन असेल सर्वसाधारण साहित्य संमेलन असेल . गुराखी साहित्य संमेलन असेल . स्वतंत्र कवी साहित्य संमेलन असेल किंवा अनेक प्रकारचे साहित्य संमेलने आयोजित करता येतात. प्रत्येकांचा लिहिण्याचा पैलू वेगवेगळा असू शकतो .
साहित्य संमेलन हे ग्रामीण असो की शहरी असो, लहान असो की मोठे असो, राजकीय असो की सामाजिक स्तरावरून आयोजित केलेल असो किंवा इतर व्यक्तिगत छोट्या मोठ्या संस्थेने आयोजित केलेल असो, शेवटी साहित्य संमेलन हे नव साहित्यिकांना चालना देणारा भाग असतो. प्रेरणा देणार असतं. ग्रामीण भागात दडलेल्या साहित्यिकांना एक प्रकारचा चांगला मार्ग मिळतो. शहरी भागा बरोबरच ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात साहित्यिक दडलेले आहेत. त्यांना फक्त संधीची अपेक्षा असते. साहित्य संमेलन म्हणजे काही उत्पन्न मिळवून देणारी बाब नसते. सामाजिक स्तरावर किंवा व्यक्तिगत जीवनाला एक प्रकारची कलाटणी देणार असत.
“राष्ट्रीय रमाई साहित्यिक काव्य मंच‘, लातूर.जिल्हा लातूर येथे दिनांक 26/8/26 रोजीच्या कवी संमेलनात धाराशिव, पुणे, सोलापूर, अंबाजोगाई,लातूर, उमरगा, इचलकंरजी, औसा,चाकूर, कोल्हापूर ,हैद्राबाद , छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, बार्शी , अंबाजोगाई, तुळजापूर, भूम, मार्डी सोलापूर, उदगीर, अहमदपूर, आदिलाबाद, तेलंगाणा येथील नामवंत ज्येष्ठ साहित्यिक कवींना निमंत्रित केल्याने त्यांची उपस्थिती राहणार आहे . त्यांचे अनुभव, त्यांच मार्गदर्शन नवकवीना उपयुक्त ठरणार आहे.
कवी समेलनातील कविता ह्या लोककल्याणकारी उद्धारासाठी विचारमय ठरणार आहेत . कवितेतून मांडलेले विचार . केलेले कष्ट हे एक चिंतनशील सामाजिक सुंदर समाजशील विचार कविंच्या सादरी करणातून स्तुतिपर गर्व करण्याचा ठरावा अशी रचना उपस्थित रषिकजनाला आनंदमय ठरणार आहेत. कवी संमेलनातून काव्य रसिकांना एकाच विषयावर नव्हे तर अनेक विषयावर , ज्वलंत विषयावर कविता ऐकायला मिळणार आहे, अनेक विषय हाताळले जाणार आहेत, यामध्ये शेतकरी आत्महत्या , सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक विषय, रुडी, परंपरा, मोबाईलची दुनियादारी, फायदे , तोटे, अंधश्रद्धा अशा एक नव्हे अनेक विषयावर या ठिकाणी सादरीकरण केले जाईल अशी अपेक्षा आहे, प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे वेगवेगळे विषय हाताळले गेल्याचे उदारणे आहेत . अनेक अनुभवी गझलकारांच्या गझल देखील ऐकायला मिळणार आहेत.
