धाराशिव (प्रतिनिधी)- सहाव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे बिल 4 कोटी 62 लाख 55 हजार 737 रूपये शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती एनव्हीपी शुगरचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे.
तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगरच्या वतीने चाचणी गळीत हंगामापासून ऊस उत्पादक शेतकर्यांना अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची परंपरा एनव्हीपी शुगर परिवाराने सुरू केली आहे. द्वितीय गळीत हंगाम 2025 - 26 मधिल सहाव्या पंधरवाड्यात 01 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीतीत ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल 2700/- प्रमाणे दि.16 जानेवारी 2026 रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे.
तरी ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आपले बिल घ्यावे. ज्यांनी खाते दिले नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.
