कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील जवळा खुर्द देवळाली, वाठवडा, पाडोळी, ढोराळा व उमरा तसेच धाराशिव तालुक्यातील कोल्हेगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिके व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्या.
कळंब तालुक्यातील पाडोळी (ना) येथील जोशी काका यांचे पावसामुळे दुर्दैवी निधन झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. कालच्या पावसाने जीवित हानी झाली असून ही दुर्दैवी घटना आहे.
कळंब व धाराशिव तालुक्यातील अनेक गावांमध्ये कालच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने परत एकदा धाराशिव जिल्ह्यात रौद्ररूप धारण केले आहे.मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सध्या सोयाबीन पिकाचा हंगाम सुरू असून बऱ्याच ठिकाणी सोयाबीन काढण्यास सुरुवात केली आहे परतीच्या पावसामुळे उरले सुरले सोयाबीन देखील हातातून निघून जाण्याचे चिंता शेतकरी वर्गास भेडसावत असून शासनाकडून केवळ तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली असून प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे खासदार ओम प्रकाश राजा निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.