तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तामलवाडी येथील गेली वर्षभरापासून बोगस खतनिर्मितीचा कारखाना खुलेआम सुरू असुन तो बोगस खतनिर्मितीचा कारखाना कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी केली जात आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये बोगस खतनिर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आले असुन तो बोगस खतनिर्मितीचा कारखाना कायमस्वरूपी बंद करावा. आशा आशयाची मागणी जिल्हाधिकारी सह संबंधित अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.