तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील बऱ्याच वर्षा पासून प्रलंबित असलेला हुतात्मा स्मारक ते आर्य चौक, किसान चौक हा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण या रस्त्याच्या रुंदीकरणास शासनाने मंजुरी दिलेली आहे. या रस्त्याच्या मंजुरीसाठी मागील काही वर्षापासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलने करण्यात आली या आंदोलनाला आज यश आले आहे. रस्ता रुंदीकरणाचा बऱ्याच वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न त्या भागातील जेष्ठ नागरिक, व्यापारी यांच्या आंदोलने व महाविकास आघाडीने घेतलेला पुढाकार यामुळे आज शासनाला या रस्ता रुंदी कारणास मंजुरी देण्यास भाग पाडले आहे.या रस्ता रुंदीकरणासाठी सत्ताधारी आमदार यांचे नगरपालिकेवर अनेक वर्षापासून सत्ता असूनही रस्ता रुंदी करणास जाणून बुजून टाळाटाळ होत होती परंतु जनतेच्या रेट्यापुढे व महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनास आज यश आलं आहे.
माजी पालक मंत्री आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब यांनी हा रस्ता प्राधिकरण आराखड्यात समाविष्ट करून मंजूर केला होता कारण हा रस्ता भवानी रोडला समांतर आहें व नवरात्र मध्ये गर्दी झाल्यास या रस्ता चा उपयोग होणार असल्यामुळे रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे होते. परंतु या रस्ता रुंदीकरणास मंजुरी मिळण्यास विलंब लागत होता आज या रस्ता रुंदी कारणास मंजुरी मिळाली आहें.
स्थानिक नागरिक व्यापारी यांनी अनेक वेळा खासदारांकडे या रस्त्याच्या मंजुरीसाठी निवेदन दिली होती अखेर त्यांच्या माध्यमातून हा विषय आज मार्गी लागलेला आहे मागील काही काळात यासाठी स्थानिक नागरिक व्यापारी यांनी व महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते यांनी अर्धनग्न आंदोलन ही केले होते. जिल्ह्याचे खासदार आदरणीय ओमराजे निंबाळकर व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रतापजी सरनाईक तसेंच माजी मंत्री मधुकर राव चव्हाण यांचे महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही आभारी आहोत.