धाराशिव (प्रतिनिधी)- शिरीन कॉलनी, गालीब नगर, सुलतान पुरा या भागामध्ये स्वछता ठेवून  रस्ते व नालीची व्यवस्था करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाअध्यक्ष आमीर शेख यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली.

निवेदनात म्हटले आहे कि , धाराशिव शहरातील शिरीन कॉलनी, गालीब नगर, सुलतानपुरा या भागामध्ये रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली असून या भागामध्ये नाल्यांची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस चालु आहेत. नाली अभावी सर्व पाणी घरासमोर पाणी साचत आहे त्यामुळे दारामध्ये चिखल होवून लहान मुले, वृध्दा नागरिकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे, त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सदरील पाण्यामध्ये डासाचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी सदरील काही भागामध्ये प्रशासनाच्या वतीने मुरुम टाकला जातो. तो पावसात पुन्हा चिखल होवून बसतो. तरी  सदरील भागामध्ये पक्के रस्ते व नाली स्वच्छता करुन व नविन नाली बांधकाम करुन परिसरातील नागरिकांची सदरील अडचण दुर करण्यासाठी आपल्या मार्फत संबंधीत कार्यालयास व अधिकाऱ्यास सदरील कामे करण्यासाठी आदेशीत करावे अशी मागणी आमीर इब्राहीम शेख जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी धाराशिव यांनी केली आहे.

 
Top