तुळजापूर (प्रतिनिधी)- मौजे तांदुळवाडी ता. वाशी येथील शेतकाऱ्यावर झालेल्या अमानुष लाटीचार्ज करणाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी स्वराज्य पक्षाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, मौजे तांदुळवाडी ता. वाशी येथील शेतकाऱ्यावर झालेल्या अमानुश लाटीचार्ज हा शेतकऱ्यामध्ये दहशत निर्माण करून शेतकाऱ्यांच्या जमिनी विनामुल्य पवनचक्की कंपनीच्या घश्यामध्ये घालणाच्या डाव पवनचक्की अधिकारी व पोलिस प्रशासन संगणमताने करत असुन शेतकऱ्यांना आपली बाजु
मांडत असताना त्याच्या अंगावर पोलिस प्रशासन हे लाटी हल्ला करून शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांने आपल्या जमिनी विनामुल्या पवनचक्की कंपनीला देण्यात यावी अशी परिस्थिती त्याठिकाणी निमार्ण करण्यात येत आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी हस्ताक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे. दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अन्यथा स्वराज्य पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. असा इशारा निवेदनामध्ये जिल्हाध्यक्ष महेश गवळी, भूम तालुका प्रमुख गणेश नलावडे, प्रमोद शिंदे, विनायक गायकवाड यांनी दिला आहे.