तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरासह परिसरात दररोज पाऊस पडत असुन त्याच बरोबर अस्वछते बाबतीत नागरिकांचा तक्रारी वाढल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता न केल्यास साथरोग पसरण्याची शक्यता निर्माण होवुन परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा तक्रारी होत आहे. विशेष म्हणजे महिन्याला स्वच्छते बाबतीत 24 लाख रुपयाचा ठेका देवुन ही स्वच्छते बाबतीत तक्रारीचा पाऊस पडत असल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर स्वच्छते बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने फिरुन लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
लातुर रोड वरील रुद्र सिटी येथील नाल्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून साचलेली घाण आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नाल्यांची वेळोवेळी साफसफाई न झाल्यामुळे परिसरात डास, मच्छर आणि अन्य कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. या परिसरात लहान मुले, वृद्ध आणि महिलांची संख्या लक्षणीय असून, घाण व दुर्गंधीमुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नाले तुंबलेले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे नगर अस्वच्छते प्रमाण वाढले असुन नाल्या तुंबुन घाण पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. तसेच सदरील ठिकाणी मोठ-मोठे जिवघेणे चेंबर दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तसेच रस्त्याचे व इतर कामासाठी खोदण्यात आलेले खड्डे तसेच आहेत. तरी या भागामध्ये स्थळ पाहणी करुन संबंधीत अधिकारी यांना आदेशीत करुन त्वरीत सदरील ठिकाणी स्वच्छतेची मोहिम राबवुन, गटारी, नाल्या स्वच्छ करुन तेथे बिचींग पावडर व किटक नाशकांन सारखी औषधांची फवारणी करुन तेथील नागरीकांच्या आरोग्यास होणारा धोका टाळावा. अशी मागणी डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना जिल्हाध्यक्ष
किरण कांबळे यांनी केली आहे. शुक्रवार पेठ भागात नाल्या तुंबुन त्याचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यातुन भाविकांना देविदर्शनार्थ जावे लागत आहे. दररोज स्वच्छता करणारे कामगार पावसाची संधी साधुन स्वच्छतेस येत नाहीत. भाविक घाणीमुळे तोंडाला रुमाल लावुन मार्गक्रमण करीत असल्याचे दृश्य शहरात सतत नजरेस पडत आहे. तसेच घाटशिळ रोडवर ही अशी परिस्थिती असुन शहर स्वछतेचा बोजावरा उडाल्याचे चिञ पहावयास मिळत आहे.