धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील चार अवैघ कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आली. गोवंशीय हत्या रोखण्यासाठी शहर पोलिस व नगर पालिकेने दोन महिन्यानंतर पुन्हा कारवाई केली. ही कारवाई वैराग नाका परिसरात केली असून, अनाधिकृत जनावरांच्या कत्तलीसाठी उभारण्यात आलेले कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले. यामुळे दुर्गंधी कमी होणार असून, परिसरातील नागरिकांची मरण यातनेतून सुटका होणार आहे. 

धाराशिव शहरात 10 मार्च रोजी खिरणीमळा, रसुलपुरा परिसरातील अनेक अवैध कत्तलखाने जेसीबीने जमीनदोस्त करणयात आले होते. या कत्तलखान्यात गोवंशी जनावरांची हत्या व कत्तल केली जात होती. गत काही वर्षापासून पोलिस प्रशासन जिल्ह्यातील विविध मार्गावर अवैध कत्तलखान्यांतून विक्रीसाठी जाणारे गोमांस जप्त करून संबंधित वाहनासह आरोपींव कारवाई करत आहे. कारवाई करूनही जनावरांच्या अवैध कत्तली करण्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळे पोलिस व नगरपालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर धाराशिव शहरातील अवैध कत्तलखाने बंद होतील अशी आशा होती. मात्र गोमाफिया ठिकाण बदलून अवैध कत्तलखाने सुरू करत गोमांस विक्रीचा सपाटा सुरूच ठेवत असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला खबऱ्याने दिली. त्याप्रमाणे धाराशिव शहरातील वैराग नाका परिसरात अनाधिकृत जनावचरांचरू कत्तलीसाठी उभारण्यात आलेले चार कत्तलखाने जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करणयात आले. यामुळे गोवंशीय जनावरांची कत्तल थांबणार असून, परिसरात होणारी दुर्गंधी कमी होणार आहे. धाराशिव शहरातील काही भागात अनेक महिन्यापासून अवैध कत्तलखाने सुरू झाले आहेत. याबाबत तक्रारी दाखल झाल्या आहेत. 

 
Top