तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील स्वछतागृह कचरा कुंड्या महिनोमहिने गायब होत असुन अस्तित्वात असलेल्या उध्दवस्त केल्या जात असल्याने याचा फटका भाविकांन  सह शहरवासियांना बसत आहे. या मंदीराकडे येणाऱ्या रस्त्यावर  स्वछतागृह कचरा कुंड्याचा अभाव  असुन   अनेक स्वछतागृह   कचरा कुंड्या गायब झालेले आहेत गुरुवारी रात्री काही अज्ञात समाजकंटकांनी आर्य चौकातील शेवटची उरलेली सार्वजनिक मुतारी ही उद्ध्वस्त केली.

गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील प्रताप टाकी समोरील, जवाहर गल्ली येथील, नगरपरिषदेच्या शेजारची, मकावती गल्लीतील, कमान वेस येथील या ठिकाणातील मुताऱ्या आधीच फोडल्या गेल्या असून ही अखेरची सुविधा देखील उद्ध्वस्त झाली आहे आता तुळजापूर मध्ये  सार्वजनिक मुता-यांची संख्या घटल्याने  .परिणामी भाविक, स्थानिक नागरिक, दुकानदार तसेच वाहनचालकांना मोठ्या गैर सोयीला सामोरे जावे लागत आहे.


डायबिटीज रुग्णांचे हाल ! 

श्रीतुळजाभवानी  दर्शनार्थ  मधुमेह म्हणजेच डायबिटीजचे रुग्ण मोठ्या संखेने येतात. अशा रुग्ण भाविकांना सार्वजनिक स्वछतागृह उपलब्ध नसल्याने यांचे हाल होवुन मुलभुत सुविधा ही विकत घ्यावी लागत आहे. या आरोग्य दृष्टीने गंभीर समस्येकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याने संताप वाढत आहे.


नगर परिषदेच्या हलगर्जीवर संतापाचा सूर 

शहरातील काही सार्वजनिक जागांवर बेकायदा कब्जा झाल्यामुळे नव्या मुताऱ्यांच्या उभारणीत अडथळा येत आहे. पण त्याकडेही नगरपरिषदेने दुर्लक्षच केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.“देवस्थान असलेल्या शहरातच मूलभूत सुविधा नाहीत हे लाजीरवाणं आहे. असा संतप्त सूर नागरिक आणि भाविकांनी व्यक्त केला.

शहराची प्रतिमा आणि नागरिकांची आरोग्य सुरक्षा दोन्ही धोक्यात आली असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी एकमुखी मागणी आहे. अन्यथा लोकक्षोभ उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


 
Top