तुळजापूर (प्रतिनिधी)- क्षयरोग (टीबी) मुक्त भारत 2025 सर्व्हे दरम्यान कुंभारी गावात एकही क्षयरोग (टीबी) रुग्ण न आढळल्याने कुंभारी गाव क्षयरोग  मुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती तुळजापूर येथे ऋषिकेश पिंपळे (प्रशासन अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर), सुखदेव पंडागळे (कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर) तसेच डॉ. रफिक अन्सारी (तालुका आरोग्य अधिकारी तुळजापूर), डॉ. अविनाश ढगे (वैद्यकीय अधिकारी, तुळजापूर) यांच्या हस्ते मा. सरपंच कुंभारी संतोष वडने, डॉ.दिनार उपासे समुदाय आरोग्य अधिकारी कुंभारी, यांचा ब्राँझ पदक व प्रमाण पत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.

तसेच उपकेंद्र स्तरावरील सिस्टर श्रीमती दूधभाते व आशा, तांबे यांचे टी बी रोगाविषयी जनजागृती करून उत्तम काम केल्याबद्दल कौतुक करण्यात आले. ग्रामपंचायत कुंभारी येथील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याचे सरपंच यांनी सांगितले.

 
Top