भूम (प्रतिनिधी)- आषाढी वारी निमित्त जाणाऱ्या पायी दिंड्या सोहळ्याच्या नियोजनाची ता .24 रोजी तहसील येथे सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न झाली .

भूम तालुक्यातून संत मुक्ताबाई आणि संत एकनाथ महाराजां यांचा पालखी सोहळा  पायी दिंडी दांडेगाव तिंत्रज मार्गे परांडा आणि सरमकुंडी फाटा कुंथलगिरी भूम मार्गे शेंद्री या मार्गे जात असणाऱ्या खानदेश विदर्भ उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व पायी दिंड्यांचं व्यवस्थित नियोजन करण्यात आले असल्याचे खबरदारी घेतल्या असल्याचे बैठकीमध्ये सांगण्यात आले . यामध्ये वारकऱ्यांच्या आरोग्य , रस्ता त्यांच्या राहण्याची व्यवस्था निवासाच्या ठिकाणची लाईट व्यवस्था येथील पाण्याची व्यवस्था याची सर्व खबरदारी  घेण्यात आलेली आहे.  बैठकीमध्ये प्रशासनाच्या सर्व विभागाचे प्रमुख या ठिकाणी आले होते. वैशाली पाटील,उप विभागीय अधिकारी , जयवंत पाटील तहसीलदार ,निलेश काकडे तहसीलदार परंडा भूम व परंडा तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .महसूल विभाग ,पोलीस प्रशासन ,ग्रामविकास ,महावितरण ,नगरपरिषद ,सार्वजनिक बांधकाम विभाग ,व जिल्हा परिषद विभाग या सर्व विभागांना कर्मचाऱ्यांच्या नेमणूक करून पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाच्या वतीने या बैठकीमध्ये तहसीलदार जयवंत पाटील यांनी दिले आहेत .यावेळी भूम तालुका वारकरी बांधव योगेश आसलकर ,विठ्ठल बाराते ,गणेश अंधारे यांच्यासह वारकरी बांधव उपस्थित होते.


 
Top