धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यां नुकताच निरोप देण्यात आला. यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

विभागाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा निरोप समारंभ आयोजित केला होता.  कॉलेजचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने तसेच सर्व विभाग प्रमुख या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. एस. एम. पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी वैष्णवी काळे आणि समर्थ मनाले यांनी सुत्रसंचालन केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवर ,सर्व शिक्षक वृंद आणि फायनल इयर चे विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा मध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम, खेळ आणि शैक्षणिक कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी मार्गदर्शनपर भाषण करताना प्राचार्य डॉ.माने यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या.

आपल्या भाषणात पुढे बोलताना नोकरीसाठी उपलब्ध संधी विषयी माहिती सांगताना तें म्हणाले म्हणाले की,स्थापत्य अभियांत्रिकी सारख्या विषयांमध्ये नोकरीच्या देश, विदेशात संधी असून विकसनशील भारताच्या जडणघडणीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचा खूप मोठा वाटा आहे. सध्या भारताचा ज्या वेगाने रस्ते,वाहतूक सारख्या क्षेत्रांमध्ये विकास होत आहे  त्या ठिकाणी अध्ययवत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजच्या नोकरी सहज उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी आपल्या पदवी बरोबरच जास्तीत जास्त कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करावा.

 विभाग प्रमुख प्रा. एस. एम. पवार यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात चालू दोन वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट,पीडब्ल्यूडी, जिल्हा परिषद, पब्लिक वर्क डिपार्टमेंट, सेंट्रल रेल्वे, टाऊन प्लॅनिंग, व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या शासकीय सेवेत निवड झालेल्या व त्याचबरोबर टीसीएस सारख्या आयटी कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा उल्लेख करत यावर्षी पास आऊट होणाऱ्या विद्यार्थ्यांना  उत्तम भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी समयोचित मनोगत व्यक्त करत कॉलेजचे आणि सर्व स्टाफचे त्यांच्या जडणघडणीत हातभार लावल्या बद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी सिव्हिल विभागातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैष्णवी काळे हिने केले तर प्रा. ए. के. पिंपळे यांनी आभार प्रदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली  द्वितीय आणि तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आणि खूप कमी वेळात एक उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला.याबद्दल या विद्यार्थ्यांचे प्राचार्य,सर्व विभागप्रमुख आणि सर्व स्टाफ यांनी कौतुक केले आहे.

 
Top