भूम (प्रतिनिधी)- आरसोली प्रकल्पातून भूम व वाशी शहरासाठी पाणीपुरवठा पाईपलाईन करू नये, मागण्यांसाठी तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांनी वंजारवाडी फाटा येथे मंगळवारी एक तास (ता. 24) रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदार यांना निवडून देऊन आंदोलन मागे घेण्यात आले .वंजारवाडी व इतर गावातील शेतकरी वारंवार रास्ता रोको आंदोलन जलसमाधी आंदोलन करत या पाईपलाईनला विरोध करत आहेत .मात्र तरीही नगरपरिषद मार्फत या पाईपलाईनचे काम चालू आहे .त्यामुळे ता 24 रोजी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्र पवित्रा घेत दीड तास रास्ता रोको आंदोलन केले .प्रशासनाने या कामाला पंधरा दिवसाची स्थगिती देण्याची आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
आरसोली येथील मध्यम प्रकल्पामधून वाशी व भूम येथील दुसऱ्या पाइपलाइनचे काम करू नये, अशी मागणी वंजारवाडी, हाडोंग्री, हिवरा, दिंडोरी, आरसोली, सावरगाव येथील शेतकऱ्यांनी केली. या प्रकल्पामधून या पूर्वी भूम व वाशी शहरांसाठी पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन गेल्या आहेत. या सहा गावांतील शेतकऱ्यांची शेती या तलावातील पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे भूम नगरपरिषद व वाशी नगरपंचायतीमार्फत होणारी दुसरी पाणीपुरवठ्याची पाइपलाइन इतर तलावातून करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी प्रभाकर डोंबाळे, प्रताप पाटील, राजेंद्र मिसाळ, बालाजी सावंत, सदीप मगर, प्रशांत कदम, विलास पाटील, सुधीर क्षीरसागर, राम सावंत, सुधीर वाघमारे, शैलेश काळे, शहाजी जगदाळे, शेषेराव मिसाळ, शेषेराव बर्वे, अमोल डोंबाळे, रवींद्र लोमटे, भाऊ काळे, नाना मोटे ,वैभव मोटे, सर्जेराव डोंबाळे, राजेंद्र गपाट या सर्व शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
भूम व वाशी या शहासाठी आरसोली मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना चालू आहे. पहिली पाइपलाइन असताना दुसरी पाइपलाइन ही याच प्रकल्पातून केली तर आमची गैरसोय होईल. या प्रकल्पावर सहा गावांच्या शेतकऱ्यांची शेती अवलंबून असल्यामुळे इतर तलावांतून पाइपलाइन करावी, अशी आमची मागणी आहे.
- विलास पाटील, शेतकरी