नळदुर्ग (प्रतिनिधी)- देशातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करुन हिंदु संकस्कृतीचे जतन करण्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे कार्य महान आहे. असे नळदुर्ग शहर ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी नळदुर्ग येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना म्हटले.
नळदुर्ग येथे दि. 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात झालेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव पोतदार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. यावेळी भाजपचे बसवराज धरणे, श्रमिक पोतदार, गणेश मोरडे, उत्तम बनजगोळे, अक्षय भोई, विजय ठाकुर, शिवसेनेचे बंडप्पा कसेकर, राजेंद्र ठाकुर, नेताजी महाबोले, सन्नी भुमकर यांच्यासह ज्ञानेश्वर घोडके, दयानंद चौरे, प्रभाकर घोडके, पद्माकर घोडके, मारुती घोडके, सुहास येडगे, विलास येडगे, निखिल येडगे,अमर भाळे, अमित शेंडगे, दत्ता घोडके यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सर्वोत्तम राजे छत्रपती शिवाजी महाराज
यावेळी बोलतांना विनायक अहंकारी यांनी म्हटले की, अहिल्यादेवींचे कार्य जगात महान असुन मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोत्तम राजे होते. तर महिलांमध्ये सर्वोत्तम साम्राज्ञी म्हणुन अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. येणाऱ्या काळात वृक्षारोपण असेल किंवा अहिल्यादेवींचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम समिती करीत आहे. असेही विनायक अहंकारी यांनी म्हटले आहे. यावेळी ज्ञानेश्वर घोडके यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली.