धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती ही राष्ट्रव्यापी संघटना असून राष्ट्रवादावर कार्यरत राहणारी आहे. या संस्थेची बैठक देवगिरी प्रांत मंत्री युवराज नळे यांच्या उपस्थितीत झाली. युवराज नळे यांची प्रांत मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यामुळे रिक्त झालेल्या धाराशिव जिल्ह्याच्या अध्यक्षपदी या बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक गझलकार भागवत घेवारे यांची साहित्य भारती च्या जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. साहित्य भारती च्या माध्यमातून अधिकाधीक साहित्यिकांना व्यासपीठ व प्रोत्साहन देण्याचा मनोदय नवनियुक्त अध्यक्ष भागवत घेवारे यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीनंतर प्रांत मंत्री युवराज नळे, साहित्य भारती धाराशिवचे मार्गदर्शक राजेंद्र अत्रे, कार्यवाह रविंद्र शिंदे, समाधान शिकेतोड यांनी श्री घेवारे यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.