भूम (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने, युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या सूचनेनुसार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुळकर यांच्या समन्वयाने धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व कळंब धाराशिवचे विद्यमान आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील, संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांचा नेतृत्वाखाली,संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात क्या हुआ तेरा वादा... या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भूम तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वालवड जिल्हा परिषद सर्कल यांच्या वतीने दिनांक 9 जून, सोमवार रोजी मंडळ अधिकारी  विकास देशपांडे, ग्राम अधिकारी महादेव गिरी यांना विद्यमान केंद्रातील व राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी, हर घर छत, जल जीवन मिशन,वयोवृद्ध नागरिकांच्या पेन्शन मध्ये वाढ, लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता, प्रत्येक नागरिकांना मोफत आरोग्याचे उपचार आदीसारख्या घोषणाचा पाऊस पाडून सत्तेवर विराजमान झाले.

ज्या योजना निवडणुकीपूर्वी जाहीर केल्या सदरील योजनेची अंमलबजावणी न करता शासन चडीचूप आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना मंडळ अधिकारी व ग्राम अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. तसेच सदरील योजनेची अंमलबजावली न केल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरून आपल्याला याचा जाब विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला.

तालुका प्रमुख अनिल शेंडगे, विधानसभा समन्व्यक दिलीप शाळू महाराज, महिला तालुका प्रमुख उमाताई रणदिवे, उपतालुका प्रमुख अब्दुलभाई सय्यद, विभाग प्रमुख रफिकभई तांबोळी, गणप्रमुख अजय कोकाटे, युवा सेना उपतालुका प्रमुख बालाजी दुधाळ, शाखा प्रमुख युवराज शेळवण, मनसूख मदने, भाऊसाहेब सुबुगडे, दत्ता खरात, अरुण खटाळ, वालवड सर्कल यांच्यासह गावातील शिवसैनिक,नागरिक आधी उपस्थित होते.


 
Top