तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका संदर्भात काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी व काँग्रेस पक्षाने वेळोवेळी आक्षेप घेतलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झालेल्या गैरप्रकारा संदर्भात पक्षाच्या वतीने उपस्थित केलेल्या शंकांचे अद्यापही निराकारण केलेले नाही.

यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून व मा. मंत्री अमित भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर व आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकार विरुद्ध काँग्रेस पक्षाने आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेऊन निवडणूक आयोग व केंद्र सरकारच्या विरोधात मशाल मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.

शनिवार दि१४ रोजी वेळ सायंकाळी ६ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वारापासून भवानी ज्योत घेऊन, आर्य चौक, कमान वेस, धाराशिव रोड, जुने बस स्टॅन्ड, गोलाई, छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे.

तरी या मोर्चात जिल्हा काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज संस्थाचे मा.पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, महिला कॉंग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, सर्व फ्रंटल, सर्व विभाग सेलचे जिल्हा, तालुका अध्यक्ष, कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड.

धिरज पाटील यांनी केले आहे.

 
Top