तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील कै. उध्दवराव पाटील सभागृह समोर असलेल्यावाहन तळात लाईट ची सोय नसल्याने येथे  अंधाराचे साम्राज्य निर्माण होवुन याचा लाभ भुरटे चोर येथे लावलेल्या वाहनांवरील मधील साहित्य चोरी चोरी करुन घेत आहेत. हा भाग लाईट लावुन प्रकाशीत करण्याची मागणी होत आहे. तुळजापूर धाराशिव रस्त्या लगत कै. उध्दवराव पाटील सभागृह परिसरात मोकळी जागा असुन येथे तात्पुरते वाहनतळ नगर परीषदने कार्यान्वित केले आहे.

या वाहनतळ पासुन मंदीर पायी चालत गेल्यास अवघे पाच मिनिटे अंतरावरआहे येथे दिवसा वाहने थांबता. माञ राञी येथे अंधाराचे साम्राज्य असल्याने येथे अंधारात वाहने उभे करावे लागतात. त्यामुळे काही वाहने चक्क रस्त्यावर उभे केली जातात. नगरपरीषद विद्युत विभाग हा भाग का प्रकाशमान ठेवत नाहीत. या बाबतीत आश्चर्य व्यक्त केले जात असुन राञी शेजारी असणाऱ्या खाजगी वाहनतळात वाहने जावेत म्हणून नगरपरीषद विद्युत विभाग दुर्लक्ष करीत नाही ना असा प्रश्न होत आहे. तरी तातडीने हा भाग प्रकाशमान करण्यासाठी मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी आदेश काढावेत अशी मागणी होत आहे.

 
Top