तुळजापूर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री भारतातील बाजारपेठेत करता यावी म्हणून ईनाम बाजार पेठ सुरु केली असुन मोबाईल मध्ये ईनाम अँप्लीकेशन डाऊनलोड करुन त्या माध्यमातून विकुन आपले उत्पन्न वाढवावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती  तुळजापूरमध्ये ई-नाम अंतर्गत मार्गदर्शक श्री रंगनाथ कटरे यांनी सखोल मार्गदर्शन  करताना केले. 

या कार्यक्रमाचा  अध्यक्षस्थानी  सभापती आशिष सोनटक्के, होतेतर यावेळी  उपसभापती  सुहास गायकवाड उपस्थित होते. केंद्र शासनाचे नवीन धोरणानुसार इ-नाम योजनेबाबत शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार बांधव यांचेसाठी बाजार समितीने सदरचे प्रशिक्षण आयोजित केलेले होते. या प्रणालीअंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समिती, तुळजापूरचा समावेश करण्यात आलेला आहे. यावेळी बोलताना कटारे पुढे म्हणाले कि, एक राष्ट एक बाजार पेठ ही संकल्पना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शाषणाने आणली. 2016 घराघरात मोबाईल पोहचले मोबाईल या डिझिटल माध्यमाचा वापर करुन देशात शेतकऱ्यांना आपला शेतमाल कधीही विक्री करता यावा म्हणून ईनाम सुरु केले. यामुळे शेतात बसुन शेतकऱ्यांना देशात माल विकण्याचा अधिकार मिळाला. आज कोट्यावधी शेतकरी तीन लाखव्यापारी तीन लाख आडत व्यापारी 4438 शेतकरी उत्पादक संघटना या राष्ट्रीय कृषी बाजार पेठ माध्यमातून 1,88,208 मेट्रीक टन शेतमालाची उलाढाल करुन शेतकरी व्यापारी आडते शेतकरी उत्पादक संघटना यांनी आपले उत्पन्न दुप्पट करुन घेतले आहे. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के यांनी बाजार समितीचा समावेश ई-नाममध्ये करण्यात आलेला असल्याने तालुक्यातील शेतक-यांनी शेतमाल विक्रीवेळी आधारकार्ड, बॅक पासबुक,मोबाईल क्रमांक इ.बाजार समितीत जमा करुन ई-नाम अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन तालुक्यातील शेतक-यांना केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाजार समितीचे सचिव उमेश भोपळे यांनी केले. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक संतोष कदम बालाजी दादा रोचकरी, दत्ता वाघमारे, जेष्ठ व्यापारी बचाटे, संभाजी मुळे, अंकुश ननवरे, सागर भोसले, महेश डोंगरे, सतिश मुदडा, वसंत पवार,चंद्रकात सोमवसे, हमाल, तोलार, बाजार समितीचे कर्मचारी चव शेतकरी बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.

 
Top