कळंब (प्रतिनिधी)- शहरात स्वच्छता मोहिम राबवून मुलभूत सुविधा तात्काळ देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात असे लिहीले आहे की,  कळंब शहरात गेल्या अनेक महिन्यांपासुन कळंब नगर पालिकेने स्वच्छता मोहिम राबविलेली नाही. त्यामुळे कळंब शहरातील अनेक भागांतील नाल्या, गटाने घान पाण्याने तुंबलेली असुन त्यांची दुर्गंधी पसरलेली आहे. तसेच डेंगू डांसाची पैदास वाढलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. पावसाळा सुरु होण्यापुर्वीच सर्व नाल्या, गटारे स्चछाता करुन घेणे गरजेचे होत पण ते केलेले नाही. सध्या पावसाळा सुरु झालेला असुन गटारांत पाणी तुंबुन घरात घुसत आहे. तसेच डासांची पैदास वाढुन नागरिक आजारी पडत आहेत व उग्र वासामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणी स्टेट लाईट देखील बंद आहेत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच संध्याकाळी नागरिकांना घराबाहेर पडणे देखील धोक्याचे झालेल आहे. कळंब शहरातील नागरिक नगरपालिकेला तात्काळ स्वच्छता मोहिम राबवण्यासाठी नागरिकाकडून मागणी होत आहे. यापूर्वी वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनाचे दुर्लक्ष केलेले आहे. तात्काळ स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी व मुलभूत सुविधांचा लाभ नागरिकांना देण्यात यावा आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले असून, अन्यथा नगरपालिकेने तात्काळ स्वच्छता मोहिम राबवली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षामार्फत तीव्र आंदोलन आंदोलन करणार असुन 8 दिवसांच्या आत कळंब न.प. ने स्वच्छता मोहिम राबविली नाही अन्यता संबंधी अधिकारी यांचे तोंडाला काळे फासुन, गाढवावर बसवून मिरवणुक काढण्यात येईल असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल, आकाश बनसोडे, अमर गोरे, श्रेयश धावारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top