धाराशिव (प्रतिनिधी)- मान्सुनपुर्व पाऊस धाराशिव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पहाणी केली. नुकसानीचा तत्काळ पंचनामा करा अशी मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
काक्रंबा येथील महादेव पाटील (यांच्या गट नं. 388) यांच्या रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे 00 हे 40 आर मोठे नुकसान झाले आहे. तसेच चन्नाप्पा वट्टे यांचे (गट नं. 819) टोमॅटो पिकाचे 00 हे 20 आर क्षेत्रावरील मान्सुनपुर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीची तुळजापुर तहसिलचे तहसिलदार अरविंद बोळंगे, तलाठी पाटील मॅडम, कृषी सहाय्यक कापसे यांच्या उपस्थितीत पहाणी करुन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करणेबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. यावेळी चेतन बंडगर, दिपक भिसे, कार्तीक वाघमारे, कालीदास खताळ, श्रीराम मोगरकर यांच्यासह स्थानिक पत्रकार बांधव उपस्थित होते. तसेच परीसरातील शेतकरी व नागरीक यांची उपस्थिती होती.