धाराशिव (प्रतिनिधी)- आमच्यासोबत लग्न कर, नाहीतर तुझी बदनामी करू, अशा धमकीला आणि त्रासाला कंटाळून 25 वर्षीय तरूणाने रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केल्याची ह्दयद्रावक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. या प्रकरणी मयत तरूणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळ तुकाराम पंडित (वय 25 रा. लिटलस्टार शाळेजवळ, बँक कॉलनी, धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. बाळूने 17 जून 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जहागिरदारवाडी येथील रेल्वेच्या बोगद्यात रेल्वे रूळावर उडी घेवून आपले जीवन संपवले. या प्रकरणी मयताची आई राधा तुकाराम पंडित (वय 50) यांनी 23 जून रोजी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार इर्शाद इसाक सय्यद (रा. पोलिस लाईन, धाराशिव) आणि नसरीन फिरोज मजकुरे (रा. मिली कॉलनी, धाराशिव) हे दोघे बाळू यात्रा त्रास देत होते. आमच्यासोबत लग्न कर, अन्यथा समाजात तुझी बदनामी करू, अशी धमकी ते सतत देत होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळूनच आपला मुलगा बाळू याने आत्महत्या केली असे आईन आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
राधा पंडित यांच्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलिसांनी इर्शाद सय्यद आणि नसरीन मजकुरे या दोघांविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम 108, 351 (2), (3) आणि 3(5) अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.