तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथील महिला शेतकऱ्याला महाराष्ट्र बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. C.M.E.G.P.मधून ट्राक्टरचे यंत्र कर्ज मागणी फाईल बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर यांनी सिबील मुळे नाकारली बाबत दि.१२ जून रोजी तसीलदार तहसील कार्यालय तुळजापूर यांना महिला शेतकरी सौ शिल्पा गणेश लगदिवे यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर मध्ये वरील कर्जाची फाईल सासऱ्याचे सिबील कोआप्लीकेंट ओटीएस मधून कर्ज भरले असल्यास कर्ज माफिचा लाभ घेतले असल्यास राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. C.M.E.G.P. महाराष्ट्र मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम अतंर्गत आर.बी.आय च्या सिबील. कोआप्लीकेट. ओ.टी.एस. मधून कर्ज भरले असल्यास, कर्ज माफीचा लाभ घेतला असल्यास, राज्यसरकार च्या व केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, तसेच पिक कर्ज संदर्भात आरबीआयने नवीन नियम आमंलात आणला आहे. मागील नियमाप्रमाणे पिक कर्ज मंजुर केले जाते.
एक रक्कम 10 टक्के वाढीव पांच वर्षात मिळणार, पण घेतलेले कर्ज व व्याज संपुर्ण रक्कम भरल्यानंतर च बँक वाढीव देतो असे बँक म्हणते. पण शेतकऱ्यांकडे जर ऐवढी रक्कम असते तर शेतकरी बँकेकडून कर्ज कशाला घेतला असता. म्हणून शेतकऱ्याची अडवणूक करून कर्जापासून सन 2014 पासून वंचीत ठेवले आहे. कर्ज मागणीसाठी दि.16-12-2024 रोजी बँकेसमोर माझे पती गणेश रामलिंग लगदिवे यांनी अमरण उपोषण केले होते. त्या वेळी बँक मॅनेजर च्या आश्वासनाने उषोषण स्थगीत केले. मँनेजर च्या सांगण्यानुसार C.M.E.G.P. मधुन ट्रॅक्टरच्या यंत्राचे कर्ज मागणीचे रजिस्ट्रेशन केले.
तरी अद्याप कर्ज मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी महिला तहसिलदार यांना व संबधीतानां निवेदन देऊन उपोषणाला माझे पती गणेश रामलिंग लगदिवे हे बसत आहे.उपोषण ठिकाण बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर या निवेदनावर सौ शिल्पा गणेश लगदिवे यांची स्वाक्षरी आहे.