कळंब (प्रतिनिधी)- शहर व परिसरात बीएसएनएल सेवेचा पुर्ता बोजवारा उडाला आहे. शहरातील किंवा परिसरातील विज पुरवठा खंडित झाला की मोबाईलची रेंज मात्र गायब होती. त्याच बरोबर सर्व ग्राहकांना फोरजी चे सिम वाटप केले. मात्र सेवा थ्रीजी मिळते. याकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळा होत आहे.
तर शहरातील साईनगर, द्वारका नगरी या भागात बीएसएनएलची रेंज येत नाही. त्यामुळे तेथील हजारो ग्राहकांनी या कंपनीला रामराम केला आहे. अधिकारी यांना अनेक वेळा तक्रारी पत्रव्यवहार करून सुद्धा अधिकारी दखल घेत नाहीत हेही तेवढेच खरं आहे. गेल्या 16 वर्षापासून कळंबचा उपविभागाचा एकच अधिकारी आहे ना त्याची बदली नात्याची सेवा चांगली. या अधिकाऱ्यांची तक्रार तरी कोण करणार असा सवाल ही ग्राहकातून विचारला जात आहे.
सोळा वर्षापासून एक अधिकारी मुख्यालयी न राहता दूरध्वनी केंद्राचा कारभार हाकतात. अनेक ग्राहकांनी सेवा चांगली नसल्यामुळे लँडलाईन फोन व मोबाईल बदलले आहेत. याच आधिकाऱ्यांनी ग्राहकांना मात्र खाजगी कंपनीचा रस्ता दाखवल्याचे बोलले जात आहे. या अधिकाऱ्यांची तात्काळ उचल बांगडी करावी अशी मागणी ग्राहकातून होत आहे. देशाची शान असलेली नावाजलेली कंपनी म्हटलं की स्वदेशी भारत संचार निगम म्हणजेच दूरध्वनी सेवा होय ही सेवा संपूर्ण भारतात एकेकाळी असणारी पण खाजगी कंपनीने पाऊल टाकले आणि स्वदेशी कंपनीला अधिकाऱ्यांनीच ग्रहण लावले. कारण सेवा चांगली न देणे, ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण न करणे, वेळोवेळी सेवा सुरुळीत न करणे, यां ना त्याकारणाने असंख्य ग्राहक खाजगी कंपनीकडे वळल्यामुळे ही स्वदेशी बनावटीची कंपनी डबघाईला आली असताना टाटा कंपनीने भारत संचार निगम ही कंपनी स्वतःकडे चालवण्यास ठेवून घेतली. त्या काळापासून तरी रेंज धरत आहे. मात्र देखभाल करून तरी या कंपनीला पुन्हा ग्राहक मिळणार का असा सवाल ही नागरिकातुन होत आहे.