तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदीरात श्रीकल्लोळ श्रीगोमुख कुंडातील नैसर्गिक झ-यांचे पाणी वाढल्याने या दोन्ही पविञ कुंडातील झरे पाण्याने “ खळखळुन वाहत आहेत. श्रीगोमुख तिर्थकुंडात काशीचा गंगेचे तर श्रीकल्लोळ तिर्थकुंडात देशातील 108 नद्यांचे 108 झ-यातुन पाणी येते अशी आख्यायिका आहे.
देविभक्त प्रथम या दोन्ही पविञ, तिर्थकुंडात हातपाय धुवुन किंवा स्नान करुन श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ जाण्याची परंपरा आहे. आजही देविभक्त येथे दोन्ही कुंडातील पाणी डोक्यावर शिंपडुन देवीदर्शनार्थ जातात. विशेष म्हणजे या दोन्ही पविञ कुंडातील पाण्याचे झरे अखंड चोवीस तास आजही वाहतात. उन्हाळ्यात या झ-याचे पाणी कमी होते. माञ यंदा मे महिन्यात 290 मिमि पाऊस झाल्याने उन्हाळ्यात या दोन्ही पविञ कुंडातील झ-यातुन धो धो पाणी अखंड चोवीस तास वाहत आहे. उन्हाळ्यात प्रथमच हे नैसर्गिक झरे पाण्याचा प्रवाहाने भरभरून वाहिल्याचे सांगितले जाते. या नैसर्गिक झ-याचे पाणी पांढरे शुभ्र स्वच्छ आहे. पाऊस पडण्या आधी श्रीकल्लोळ श्रीगोमुख तिर्थकुंडातील झ-याचा माध्यमातून करंगुळी जाडी एवढेच पाणी येत होते. आता माञ चक्क दीड ते दोन इंच अखंडीत पाणी या झ-या मधुन येत आहे. त्यामुळे निसर्गाची करणी आणि उन्हाळ्यात पाणी अशी म्हणण्याची वेळ आली आहे.