धाराशिव (प्रतिनिधी)-नगरपालिकेचा कंत्राटा पुरता संबंध असलेल्या पंकज पाटील यांनी सौम्या-गोम्याच्या सांगण्यावरून आपल्या आवाक्यात नसलेल्या बाबीवर बोलू नये.अमित शिंदेचा पक्ष कोणता हे विचारण्यापूर्वी त्यांनी त्यांचे पिताश्री जयंत पाटील यांचा पक्ष कोणता आहे हे त्यांनाच विचारावे आणि मग बोलावे.
बायोमायनिंगची निविदा तुमचा नगराध्यक्ष असताना 17% जास्तीच्या दराने का दिली यावर भाष्य न करता विषयांतर करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू नका.त्या ठरावावर अमित शिंदे यांच्या पत्नी सौ वंदना ताई यांची सही नव्हती त्यामुळे त्यांना यावर बोलण्याचा अधिकार आहे.हे तुम्हाला माहिती नसेल कारण तुमचा नागरपलिकेचा संबंध हा फक्त गुत्तेदारी पुरता मर्यादित असून तुम्ही केलेली आंदोलने देखील कंत्राट पदरात पाडण्यासाठी असतात हे शहरवासीयांना माहिती आहे.वॉर्डात निवडून येण्याची क्षमता नसल्याने आपल्याला असल्या विषयावर बोलणं शोभत नाही.येणाऱ्या निवडणुकीत निवडणून येवून आपली उंची वाढवा आणि मग बोला.
यापूढे अशा विषयावर बोलताना आपली उंची काय आहे..? आपण कोणावर बोलतो..? याचा विचार करून बोलत ज म्हणजे तोंडावर पडण्याची वेळ येणार नाही.सर्व धाराशिव शहरातली नागरिकांच्या वतीने तुम्हाला आमचं आव्हान आहे की हिम्मत असेल तर आपले पिताश्री जयंतराव पाटील यांचा पक्ष कोणता हे जनतेला सांगा.नगरविकास विभागाच्या निविदा जास्तीच्या दराने द्यायच्या नाहीत हा मुख्यमंत्री फडणवीसांनी निर्णय घेतला असताना आंदोलन का केले..? बायोमायमिंगच्या निविदेबाबत सत्य केंव्हा सांगणार..?