धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी भूम तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह,भूम येथे होणार आहे. तहसिलदार जयवंत पाटील यांच्या वतीने सर्व सरपंच,सदस्य व इच्छुक व्यक्तींना सोडतीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सोडत प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पाडली जाणार असल्याची माहिती तहसिलदार,भूम यांनी दिली.