धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे निपुण भारत अभियानाच्या अंतर्गत चावडी वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमाला आमदार कैलास पाटील  यांची उपस्थिती लाभली. शाळेचे मुख्याध्यापक बशीर तांबोळी  यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या साहित्यकृतींचे चावडी वाचन सादर केले. इयत्ता पहिली व दुसरी च्या विद्यार्त्यांनी इंग्रजीचे व मराठीचे अस्सखलीत वाचन केले. यावेळी आमदार पाटील यांनी व डायटचे प्राचार्य दयानंद जटनूरे  यांनी शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. आळणी शाळेने जिल्ह्यात गुणवत्तेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे असे प्रतिपादन केले. यावेळी आमदारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, निपुण भारत अभियानाच्या माध्यमातून मुलांमध्ये वाचन, लेखन आणि गणन कौशल्ये विकसित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांची शैक्षणिक प्रगती जलद होते.

उत्कृष्ट आणि अस्सखलीत वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आमदार पाटील यांनी शाल घालून सत्कार केला आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. इतर काही शाळेतील नववी, दहावी च्या मुलांना इंग्रजी वाचन करता येत नाही पण आळणी शाळेतील पहिली व दुसरीचे मुले इंग्रजीचे अस्सखालीत पणे वाचन करतात याबद्दल गौरोदगार काढले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गोष्टी, कविता आणि प्रासंगिक वाचन व लेखनाने उपस्थितांना प्रभावित केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिवचे प्राचार्य डॉ. दयानंद जेटनुरे यांनी निपून भारत विषयी सविस्तर माहिती सांगितली आणि सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी येडशी बिट चे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश पारवे, उपळा केंद्राचे केंद्रप्रमुख शेषराव राठोड, येडशी केंद्राचे केंद्रप्रमुख विवेक सरवदे, केंद्रीय मुख्याध्यापक राजाभाऊ गाढवे व बीट मधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल. तसेच त्यांचे भाषिक आणि बौद्धिक कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. असा विश्वास शाळेच्या प्रशासनाने व्यक्त केला.

या वेळी कार्यक्रसाठी गावातील उपसरपंच कृष्णजी गाडे, पोलीस पाटील प्रमोद माळी, तंटामुक्ती अध्यक्ष शामसुंदर लावंड,शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष संजीवनी पौळ, अफसाना शेख, सदस्यां अनिता पौळ, माजी अध्यक्ष विजयकुमार नांदे, वैभव वीर, महेश वीर, निलेश कदम, अण्णा कदम, विकास पाटील, रवी कोरे,जयवंट चौगुले, पवन माळी, संदीप वीर, मधुकर कोरे, दादा गायकवाड, किरण कोळी,ज्ञानेश्वर निंबाळकर सुनील माळी, येडशी बिट मधील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशीला म्हेत्रे यांनी केले. आभार प्रदर्शन हनुमंत माने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  शाळेती  दिनेश पेठे,  उत्तम काळे, वर्ष्या डोंगरे, सुनीता कराड, मंजुषा नरवटे,  क्रांती मते, सुलक्षणा ढगे, राधा वीर, व युवा प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी दादासाहेब कचरे, सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

 
Top