धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , धाराशिव च्या वतीने भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह दि .८ ते १४ एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात येत असून त्या अंतर्गत विविध स्पर्धा जिल्हाभर घेण्यात असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
श्रीपतराव भोसले हायस्कूल व समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा प्रशालेमध्ये पार पडल्या . प्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनाकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
या वेळी प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे , समाज कल्याण निरीक्षक युवराज चव्हाण , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम व पर्यवेक्षक सुनील कोरडे उपस्थित होते .या नंतर वक्तृत्व व निबंध स्पर्धेत स्पर्धा पार पडल्या .या वक्तृत्व स्पर्धेत कु . माने स्वानंदी अरुण प्रथम तर पाटील सिद्धी घनश्याम द्वितीय तर गंदुरे प्रेरणा नितीन तृतीय व उत्तेजनार्थ साबळे संस्कृती सदाशिव ,भोसले प्रथमा अनुल . या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले
तर निबंध स्पर्धेत कु . सरवदे वेदश्री उमेश प्रथम तर द्वितीय घुटे रागिनी श्रीनिवास तर तृतीय सोनटक्के तृप्ती बालाजी व उत्तेजनार्थ आहेर शिवकन्या चांगदेव हिने यश प्राप्त केले .परीक्षक म्हणून मुळे एन .एस , खडके एस . एस . व राजेंद्र जोगदंड यांनी काम पाहिले . तर राजाभाऊ पवार , शरद क्षीरसागर , शिवाजी भोसले , शंकर माकणीकर यांचे सहकार्य लाभले .