भुम (प्रतिनिधी)- आधुनिक काळातील विद्यार्थी हा विज्ञान व तंत्रज्ञान यांनी परिपूर्ण असला पाहिजे.केवळ‌ पुस्तकी ज्ञानाचा आधुनिक काळात उपयोग नसुन तंत्रज्ञानयुक्त शिक्षण आवश्यक आहे‌ असे प्रतिपादन विस्तार अधिकारी सुर्यकांत साळुंखे यांनी केले ते आष्टा येथे आयोजित पहीलीच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात बोलत होते.जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव सोहळा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास पहिलीच्या सर्व  विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती होती.सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक टोप्या,साखरेचे हार व पुष्पगुच्छ देऊन पालकांचाही फेटा व पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गिलबिले, सरपंच सुनिल  बापु जाधव, तात्यासाहेब आष्टेकर, अरुण दादा काकडे, यांच्यासह गावातील अनेक शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमात स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक जवाहर भोसले,संजिवन तांबे, विठ्ठल सारुक, अशोक नलावडे, विजयालक्ष्मी उपळकर, पुतळा जगताप , अनिता नाईकवाडे यांनी केले .

 
Top