धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य,समता आणि बंधुतेच्या तत्त्वांवर आधारलेली एकात्म राष्ट्रव्यवस्था दिली. राज्यघटनेच्या कलम 46 नुसार,राज्याने अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हिताचे संरक्षण करावे,असा स्पष्ट उल्लेख आहे. या तत्त्वांच्या अनुषंगाने राज्य शासन वंचित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे.
या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी,तसेच संविधानात्मक मूल्यांबाबत जनजागृती व्हावी,या उद्देशाने राज्य दरवर्षी 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह“ साजरा करण्यात येतो.
यावर्षी सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.8 एप्रिल : सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन व पत्रकार परिषद.9 एप्रिल : संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन,संविधान जनजागृती.
10 एप्रिल शाळा,महाविद्यालये व वसतिगृहांमध्ये वक्तृत्व,निबंध,लघुनाट्य स्पर्धा.,11 एप्रिल योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात वाटप,विभागीय कार्यक्रम.12 एप्रिल पथनाट्य, लघुनाटिका,मार्जिन मनी योजना कार्यशाळा,महात्मा फुले जयंती.13 एप्रिल : ज्येष्ठ नागरिक मेळावे,रक्तदान शिबिरे,स्वच्छता अभियान.14 एप्रिल: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन,व्याख्याने,चर्चासत्र,दादासाहेब गायकवाड मेळावा व प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.