कळंब (प्रतिनिधी)- तालूक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेच्या निमित्त उस्मानाबाद विभागातून चैत्र वारीसाठी 160 जादा बस गाड्या तर पंढरपूर शिखर शिंगणापूर यात्रेसाठी 45 ज्यादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर येथील कळंब आगारातून चैत्र पोर्णिमावारी साठी (येडेश्वरी) येरमाळा या यात्रेसाठी दि. 11 ते 15 एप्रिल रोजी पासून पाच दिवस चालणाऱ्या येरमाळा (ता. कळंब) या यात्रेसाठी जाण्यासाठी भक्तांना 30 जादा बस गाडयांची व्यवस्था केली आहे. अशी माहिती आगार प्रमुख एस. डी. खताळ यांनी दिली आहे.
गतवर्षी यात्रेत कळंब आगाराने 17 जादा बस गाडया सोडून 22 हजार 05 कि .मी . च्या फेऱ्या मारुन 12 लाख 51 हजार 177 रू चे उत्पन्न मिळवले होते. तर या वर्षी कळंब आगारातून 30 जादा बस गाडया सोडून 24 हजार 206 किमीच्या फेऱ्या मारुन 15 लाख 63 हजार 971 रूपयाचे उदिष्ठ ठेवले आहे. या यात्रेसाठी खास 10 कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केले आहेत. या यात्रेसाठी धाराशिव आगारातून 30 बसेस, उमरगा आगारातून 10 जादा गाड्या,भूम आगारातून 35 जागा बस, तुळजापूर आगारातून 35 बस गाड्या, कळंब आगारातून 30 तर परांडा आगारातून 20 जादा बस गाड्या अशा एकूण उस्मानाबाद विभागातून 160 बस गाड्या सोडून ही यात्रा यशस्वी करण्यासाठी यात्रा प्रमुख विभाग नियंत्रक विनोद कुमार भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख, विभागीय वाहतूक अधीक्षक संतोष कोष्टी, सुरक्षा दक्षता अधिकारी श्री. चि. नेहरकर, विभागीय अभियंता श. अ. उभाळे, उपयंत्र अभियंता सु. ब. थोरबोले तर येरमाळा यात्रा प्रमुख तथा कळंब आगार प्रमुख एस. डी. खताळ यांच्यासह सहाय्यक वाहतूक अधीक्षक आर. आर. जानराव, वाहतूक निरीक्षक निलेश जाधव,सहाय्यक वाहतूक निरीक्षक अभिजीत धाकतोडे,सहाय्य कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, आगार लेखआकार लखन कांबळे, आरक्षण विभाग प्रमुख सुशील हुंबे, वाहतूक नियंत्रक नामदेव जगताप,गोविंदराव जाधवर, प्रभाकर झांबरे, विलास जाधव, गणेश गोरे, तौर हे काम पाहत आहेत. तर परिसरातील भाविक भक्तांनी बसनेच प्रवास करावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.