भुम (प्रतिनिधी)-  जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ ,नागपूर यांचा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार भूम तालुक्यातील पाथरूड येथील सामाजिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रा.अलका सपकाळ यांना जाहीर झाला आहे. हा कार्यक्रम 30 मार्च रोजी नागपूर येथे संपन्न होणार आहे. तशा आशयाचे पत्र अध्यक्ष डॉ.दीपक कुमार खोब्रागडे  पाठविले आहे. 

सपकाळ यांनी आपल्या लेखणीतून कष्टकरी, कास्तकरी, वंचित, महिला वर्गाच्या प्रश्नांवर सातत्याने लेखन केले आहे. त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत.समाजामध्ये समता, बंधुता, मानवता या मूल्याची रुजवण करण्यासाठी 'चोखोबा  ते तुकोबा एक वारी समतेची' संयोजन समितीच्या अध्यक्ष म्हणून आपले योगदान देत आहेत.  महाराष्ट्रातील अनेक साहित्य आणि सामाजिक चळवळीत आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी वाचन चळवळ ,पुस्तक दान, व्याख्यान असे उपक्रम राबवत आहेत त्यासाठी अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, यांची भूम तालुका शाखा सुरू करत आहेत. ताळा गाळातील सामाजिक प्रश्नांचे सामाजभान  असणाऱ्या कृतिशील कवयित्री प्रा. अलका सपकाळ यांना हा जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा गौरव आहे. या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

 
Top