कळंब (प्रतिनिधी)- कर कर्जा नही देंगे !बिजली का बिल भी नही देंगे ! संपूर्ण कर्जमुक्ती जागृती अभियान दि. 19 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत संपूर्ण कर्जमुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते साहेबराव करपे कुटुंबीयांच्या समृद्धदिनी समारोह कार्यक्रम 19 मार्च बुधवार रोजी सकाळी 10 वाजता पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर एकदिवशी धरणे आंदोलन होणार आहे.
या आंदोलनामध्ये सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार यांचे मायक्रो फायनान्स ,पतसंस्था ,खाजगी सावकार यांच्या कर्जातून मुक्तता करा .दुधासह सर्व शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे. शेतीपंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळाली पाहिजे. ऊसाला प्रति टन 5 हजार रुपये भाव द्या, नाहीतर दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करा. वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा. यासह अन्य मागण्यासाठी या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील, कालिदास आपेट, ॲड. अजित काळे, शिवाजी नांदखिले हे उपस्थित राहणार आहेत. तरी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत भराटे यांनी केले आहे.