धाराशिव (प्रतिनिधी)- बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी बुध्दविहार कायदा 1949 रद्द करून महाबोधी बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि.18) रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार धाराशिवचे जिल्हा नेते रवि माळाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी बुध्दविहार कायदा 1949 रद्द करून महाबोधी बौद्ध विहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी धाराशिव जिल्हा नेते रवि माळाळे, मराठवाडा उपाध्यक्ष पोपट लांडगे, युवक तालुकाध्यक्ष उमेश माने, दिलीप कांबळे, सोनू माळाळे, आकाश राठोड, गिरीश माळाळे, रोहन वाघमारे, बंटी रोकडे, असिफ पठाण, कुणाल वाघमारे, अझर पठाण, मोहसीन तांबोळी, जग्गू दादा सोनवणे, सागर माळाळे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.