धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात शासकीय हरभरा नोंदणी व खरेदी त्वरित करण्यात यावी, अन्यथा येत्या आठ दिवसात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे. याबाबत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे बुधवारी (दि.19) निवेदन दिले आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यामध्ये रब्बी पिकामध्ये हरबरा हे प्रमुख पीक असल्याने त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये झाले आहे. शासनाने हमीभाव नोंदणी व खरेदी आजपर्यंत चालू न केल्याने शेतकऱ्यांकडील हरभरा 4800 रुपये प्रति क्विंटल भावाने व्यापारी खरेदी करत आहेत. यामुळे शेतकयांचे प्रतिक्विंटल मागे एक हजार रुपयाचे नुकसान होत आहे. तरी शासनाने जिल्ह्यामध्ये 50 ठिकाणी शासकीय हमीभाव नोंदणी व हरभरा खरेदी केंद्र चालू करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळावे. अन्यथा येत्या आठ दिवसात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय पाटील दुधगावकर यांनी निवेदनात दिला आहे.

 
Top